Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the covernews domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u280364396/domains/thekesari.live/public_html/wp-includes/functions.php on line 6121
काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं...अजित पवार - THE KESARI
April 18, 2025

काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं…अजित पवार

WhatsApp Image 2025-04-13 at 5.59.07 PM

बारामती : मी काका कुतवळ यांना एका रस्त्याबद्दल सांगितलं आहे. त्याबद्दल सहकार्य करा. मी बीडीओंना सांगितले आहेतहसीलदारांना सांगितले आहेपीआयला सांगितले आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्याकारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालत नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल दादा घसरलेदादा कोणावर घसरले नाहीतअसंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना टिप्पणी केली.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. कार्यक्रमास महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकरअपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादारउप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोडजलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबलतहसीलदार गणेश शिंदेगट विकास अधिकारी अनिल बागलजनाई शिरसाई योजनेचे कार्यकारी अभियंता अशोक शेटेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता राजकुमार जाधवपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकरकुतवळवाडी- बोरकरवाडीच्या सरपंच रुपाली भोसलेउपसरपंच राणी बोरकरटी.सी.एस. फाउंडेशनचे सिद्धार्थ इंगळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणालेशरद पवार यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला. पाण्याशिवाय काहीही होऊ शकत नाहीयासाठी आम्ही जनाई शिरसाई योजना केली. योजना करणं आमचं काम आहे. परंतुत्याचा मेंटेनन्स करणं हे तुमचं काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजेअसंही अजित पवारांनी म्हटलं आहे. नागरिकांना पाणी पुरवठा करणे शासनाचे कर्तव्य असून नागरिकांना पाणी मिळण्याकरीता जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचा ४६० कोटी रुपयाचे बंद पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. आज लोकार्पण झालेल्या पाईपलाईनमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.  पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे अत्याधुनिक साधनाचा वापर करुन शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. शासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्ती करण्याकरीता निधीची गरज असतेत्यामुळे नागरिकांनीही नियमितपणे पाणीपट्टी भरुन सहकार्य करावेअसे आवाहन पवार यांनी केले.

उपसा सिंचन योजनेसाठीवर सौर पॅनल बसविण्यात येणार

आगामी काळात जनाई शिरसाई आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी सौर पॅनल बसविण्यात येणार आहेत. सौर उर्जेद्वारे निर्मिती होणारी वीज महावितरण कंपनीला दिली जाणार असून यामुळे योजनेच्या वीज देयकात कपात होईलत्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपट्टीतही लाभ होईलअशी माहिती देखील पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी पुरवठा योजनांची पाहणी

पवार यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणाऱ्या मुर्टी व इतर ७ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आणि मुर्टी व लोणी भापकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सस्तेवाडी येथील तलावाच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणालेया योजनेच्या माध्यमातून परिसरातील ११ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहेनागरिकांना पूर्णवेळ पाणी पुरवठा होण्यासाठी महावितरणने वीजेच्या फिडरचे काम वेळेत पूर्ण करावे. पाईपलाईनमधून पाणी गळती होणार नाहीयाबाबत दक्षता घ्यावी. तालुक्यात रेल्वेरस्तेपाणीआरोग्यशैक्षणिकक्रीडा आदी क्षेत्रात विविध विकास कामे सुरु असून ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्णदर्जेदारटिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावेअशा सूचना पाहणीप्रसंगी पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

नागरिकांना पक्की घरे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

राज्यात २० लाख घरे मंजूर करण्यात आली असून पुणे विभागातील ३० हजारपैकी बारामती तालुक्यात ५ हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक दूर्बल घटकातील कुटुंबाना पक्की व हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

नागरिकांना विश्वासात घेऊनच सुपा ग्रामपंचायत प्रारुप विकास आराखडा अंतिम करण्यात येईल

नागरिकांच्या मुलभूत गरजा भागविण्याच्यादृष्टीने सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता विकास आराखडा तयार करण्यात येतो. यामध्ये रस्तेशाळाभाजी मंडईस्मशानभूमीदफनभुमीमंदिरेघनकचरा व्यवस्थापन केंद्रमहावितरण केंद्रदवाखानाकृषी उत्पन्न बाजार समितीघरकुल योजनामैदानक्रीडांगण आदी पायाभूत सुविधा उभारण्याकरीता आरक्षण निश्चित करण्यात येते. आगामी सन २०४६ मधील लोकसंख्येचा विचार करून सुपा ग्रामपंचायतीचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने नागरिकांकडून प्राप्त सूचना व हरकतींच्या सुनावणीदरम्यान नागरिकांना विश्वासात घेवून प्रारुप आराखडा अंतिम करण्यात येईल. संपादित केलेल्या जमिनीचा नागरिकांना योग्य तो मोबादला देण्यात येईलयाकामी नागरिकांनी सहकार्य करावेअसे आवाहन पवार म्हणाले

error: Content is protected !!