Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the covernews domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u280364396/domains/thekesari.live/public_html/wp-includes/functions.php on line 6121
बारामतीतील लोकन्यायालयात साडेपाच हजार खटले निकाली, साडेबारा कोटीपेक्षा अधिक रकमेची वसुली.. - THE KESARI
April 19, 2025

बारामतीतील लोकन्यायालयात साडेपाच हजार खटले निकाली, साडेबारा कोटीपेक्षा अधिक रकमेची वसुली..

IMG-20240730-WA0152
बारामती : बारामती येथील जिल्हा न्यायालयात  शनिवारी झालेले लोक अदालतीमध्ये 5513 खटल्यांचा निपटारा झाला असून 12 कोटी 59 लाख 6717 रुपयांची वसुली झाली आहे .
जिल्हा न्यायाधीश व्ही.सी बर्डे, जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस एस सस्ते, जिल्हा न्यायाधीश आर के देशपांडे कोर्ट इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली सर्व न्यायाधीश वर्ग व बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बर्डे व सहकारी वकील यांचे संयुक्त विद्यमाने हे लोक न्यायालय पार पडले.
एकूण सहा पॅनल मध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर  आय ए आर मरछिया कोर्ट, एम आर वानखेडे कोर्ट, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ओ एम माळी कोर्ट, डी.पी पुजारी कोर्ट, पी पी काळे कोर्ट, व्ही व्ही देशमुख कोर्ट यांचेसह बारामती बार मधील वकिलांनी काम केले.
सदर लोक न्यायालय मध्ये  दाखल पूर्व प्रकरणांमध्ये चार कोटी 22 लाख 78 हजार 175 रुपयाची वसुली झाली, मोटार अपघाताचे दहा खटले निघाली निघाले त्यामध्ये एकूण सात कोटी 89467 रुपयांची नुकसान भरपाई पिडीतांना मंजूर करण्यात आली, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कायद्यांतर्गत पाच कोटी 4 लाख 43 हजार 409 रुपये वसूल झाले. तेरा दिवानी खटले निकाली निघाले असून 64 लाख 46 हजार 448 रुपयांची तड जोड विविध दाव्यामध्ये झाली. करसंबंधीचे( रेवेन्यू) चे 3155 इतके दावे निकाली निघाली असून एक कोटी 14 लाख 24 हजार 603 रुपये वसूल झाले. एकूण 5544 दाव्यामधे बारा कोटी एकोन साठ  लाख सहा हजार सातशे सतरा दावे निकाली निघाले.
“नियमितपणे होणाऱ्या लोक न्यायालयामध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सामील होऊन आपल्या खटल्याचा तडजोडी द्वारे खटले मिटवल्यास कायदेशीर सोपस्कारामुळे होणारा विलंब टळू शकतो असे मत जिल्हा न्यायाधीश व्ही सी बर्डे, एस एस सस्ते व जिल्हा न्यायाधीश आर के देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केले.
error: Content is protected !!