प्रवाशांची संख्या जास्त एस टी वाहतूकच्या फेऱ्या मात्र आहे त्याच !

यवत ( प्रतिनिधी ) : दौंड तालुक्यातील पुण्यापासून ४५ किमी अंतर असलेल्या यवत येथे एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने एसटीच्या फेऱ्या कमी आहेत त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
दौंड तालुक्यातील यवत येथे सोलापूर, उस्मानाबाद, इंदापूर, बार्शी ,करमाळा, जामखेड, राशीन, मोहोळ, अक्कलकोट,तुळजापूर, आदी ठिकाणी जाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, यवत येथे रोज पुण्याहून एसटी या मार्गावर धावत असतात. सर्व मार्गावर जाणाऱ्या बसमध्ये यवत वरून सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, बार्शी, उमरगा, इंदापूर, भिगवन व इतर स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्या कारणाने यवत वरून पुढे जाण्यासाठी एसटीत जागाच नसते, महाराष्ट्र परिवहन महामंडळाची एसटी बस पुण्याहूनच पूर्ण क्षमतेने प्रवासी भरून येत असतात त्यामुळे त्या थांबतच नाही आणि थांबल्या तर त्या बसमध्ये जागा नसते त्यामुळे प्रवाशांची शालेय विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत आहे. प्रसनाने या या भागात बसची संख्या वाढावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
याबाबत स्वारगेट डेपोशी संपर्क साधला असता स्वारगेट पासूनच या सर्व मार्गावरील एसटी बस पूर्ण क्षमतेने भरून जातात त्यामुळे पुढे ते एसटी चालक एसटी थांबू शकत नाही आणि प्रवाशांची संख्या जास्त झाली असली तरी बस मात्र तेवढ्याच आहेत बस वाढवणे गरजेचे असताना शासनाने बसची संख्या वाढवावी त्यामुळे सध्या जेष्टनागरिक व महिलांना एसटी प्रवासात सवलत आहे त्यामुळे सर्वच प्रवाशी एसटीकडे वळाले आहेत अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर दिली.